Posts

Showing posts from January, 2020

तरंगे वंशाचा इतिहास

Image
गुजरात मधील मेहसाणा जिल्यातील तरंगा टेकडीच्या क्षेत्रात तरंगा हे जैन मंदिर वसले आहे. तरंगा टेकडीच्या परिसरात हे लोक राहत असल्यामुळे या वंशाला तरंगे हे नाव मिळालेले आहे.हे मंदिर १२ व्या शतकात सोळंकी कुळातील राजा कुमारपाल ने बांधले आहे. सोळंकी वंशाच्या राजांनी जैन धर्म स्वीकारला होता. महाराष्ट्रात फलटण जवळ तरंगे ह्या सोळंकी कुळातील लोकांची वसाहत आहे.

असा घडला महाराष्ट्र(प्राचीन औंड्र,पुंड्र आणि कदम वंशाचा इतिहास)

Image
असा घडला महाराष्ट्र(प्राचीन औंड्र,पुंड्र आणि कदम वंशाचा इतिहास) महाराष्ट्र हे देशातील अतिशय महत्वाचे राज्य. जेव्हा देशावरती आणि संस्कृतीवरती संकट आले त्यावेळेस महाराष्ट्रच पुढे आला होता.महाराष्ट्र आणि प्राचीन तुर्कीची "हट्टी" भूमी यात बरेच साम्य आहे. हट्टी भूमी हि सुद्धा महाराष्ट्राप्रमाणे डोंगराळ आणि झाडाझुडपांनी व्याप्त होती. याठिकाणी अनेक गढ किल्ले होते. विंध्याच्या दक्षिणेकडील धार,मराठवाडा ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश चा सीमावर्ती भाग हा दंडकारण्याने व्याप्त होता. या भागाचे प्राचीन नाव "मर-हट्टी" भूमी हे होते. "मर-हट्टी" हा कानडी शब्द आहे. मर म्हणजे झाडेझुडपे आणि "हट्टी" म्हणजे वसाहत. "मर-हट्टी" म्हणजे झाडाझुडपांनी व्याप्त वसाहत. मूळ मराठा योद्धे याच भागात उदयाला आले. या भागाच्या पश्चिमेककडील भाग हा सुपीक प्रदेश होता. या भागात धनगर आणि कुणबी/माळी लोकांची वसाहत होती. ईसवी.सन. पुर्व ५०० सालांपासून ते इसवी पाचव्या शतकापर्यंत शक आणि हुण लोक भारतात येऊ लागले. शक लोक नंतर दक्षिणेकडे आले. त्यांनी इथल्या सातवाहन साम्राज्य आणि मल्ल जमातीच

इतिहास बदलविणाऱ्या परंतू दुर्लक्षित जमाति,वंश आणि त्यांची त्यांची मुळ कार्यक्षेत्रे

Image
या जमाती दुर्लक्षित राहिल्या कारण दुर्गम भागात राहून या लोकांनी योद्धे घडविले. यांतील धारचे पवार आणि उज्जैन चे कार्दमकच फक्त प्रास्थापित घराणी होती परंतू नंतर त्यांचीही सत्ता गेली. नंतर हे दिल्ली सुलतानांचे सरदार बनले परंतू स्वराज्य स्थापनेचा कट यांच्या डोक्यात शिजत होता. त्यानुसार यांनी योजना आखल्या. बरेच दर्जेदार सरदार घडविले. भोसले वंशाला उचित ठिकाणी नेऊन पोहचविले. नंतर शिवछत्रपतींचे  मुख्य शिलेदार हेच लोक होते. यांच्याशिवाय स्वराज्य स्थापनेची आपण कल्पनाच करू शकत नाही.छत्रपती शाहूंनी तर या लोकांना अमाप जहागिऱ्या लाटल्या होत्या. मेंढपाळ,शेती,शिकार आणि किनारी भागात मासेमारी आणि मिठागरे चालवून हे लोक त्यांची उपजीविका करत. हे लोक दुष्काळी आणि डोंगराळ भागात शेती करत परंतू सुपीक भागात शेती करणारे कुणबी आणि यांच्यात दूर दूरचा फरक होता. या भागातील राष्ट्रकूट,चालुक्य,यादव इत्यादी. मोठ्या साम्राज्यांत हाटकरांचा मोठा भरणा असे. बरेच हाटकर जहागिऱ्या मिळवून प्रस्थापित घराणी झाली होती.मात्र मुस्लिम आणि ब्रिटिश आक्रमणामुळे हाटकर पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यामुळे इथे उल्लेख केलेली बाकीची

आमच्या गावातील किल्ला

Image
गावात एक किल्ला आहे.किल्याचा एकंदर आकार पाहता ही गढी असावी.ही गढी कधी बांधली याचा काही लिखित पुरावा नाही आहे परंतू या ठिकाणी लढाईच्या खुणा आहेत.कदाचित सुल्तानी आक्रमणामुळे येथील लोक विखुरले असावेत.आम्ही ही गढी असलेल्या सुपिक गावात राहतो परंतू आमचे सर्व नातेवाईक हे आजूबाजूच्या दुष्काळी गावांत पसरले आहेत. गांव फलटण पासून ८० किमी अंतरावर आहे.फलटण लाही अशीच गढी आहे आणि फलटणच्या या गढीत सुद्धा आक्रमण झाले होते आणि या गढीत राहणारे लोक आजूबाजूच्या दुष्काळी भागात पसरले होते असे लोक अजूनही बोलतात परंतू याचा काही लिखित पुरावा नाही आहे कारण इतिहास हा जेत्यांनी लिहलेला असतो आणि तत्कालीन छोट्या गावांतील इतिहास हा लिखित राहत नसतो किंवा तो नष्ट केला जातो.  

निसर्गाचा नियम

काही हजार वर्षे अगोदर ताटातूट झालेली माणसे नंतर आपल्या लोकांना भेटतात आणि आपल्याच लोकांच भल करतात हा निसर्गाचा नियम आहे.म्हणजे नदी कधीतरी सागराला मिळतेच.सुलतानी आक्रमणामुळे पुर्ण समाज हा विखुरला होता. बरेच लोक माळरानावरती मेंढपाळ करत होते.अशातच आमचे पुर्वज हिराजी-नाईक(मदने) हे सरदार बिजापूर भागातून गावात आले होते.त्यांना सधन गावची जहागीर मिलाळी होती.नाईक असुनसुद्धा त्यांनी त्यांची मुलगी एका मेंढपाळ घरात दिली होती. त्यांनी गावात महालक्ष्मी देविचे मंदिर बनविले .मुलीकडची परिस्थिती नाजूक म्हणून मुलीकडच्या लोकांना मंदिराच्या पुजेचा मान दिला.आजपण मंदिराचे पुजारी हे शेंडगे आडनावाचे लोक आहेत. या एका पुर्वजाची आज ५०० कुटुंबे झाली आहेत.गावातील ७०% जमिन मदने यांच्या ताब्यात आहे.गावात पाटलांचा वाडा आजही आहे. नंतर मदने लोक शेती करु लागले.पुढे भोसले घराण्याच्या उदयानंतर गावची जहागिर अक्लकोटच्या भोसले घराण्याला मिळाली.गावात भोसले यांची तीनच कुटुंबे आहेत.

कुर्द आणि आजचे तुर्क हे एकच आहेत काय?

Image
कुर्द आणि तुर्क हे एकच परंतू त्या भागात तुर्कांनी राज्य केल्यामुळे त्यांचे शेजारील भाऊबंध स्वत:ला तुर्क म्हणू लागले.खर म्हणजे तुर्क हे पुर्वेकडून पश्चिमेकडे गेलेले आक्रमणकारी मंगोलांचे भाऊबंध तर कुर्द आणि तुर्क हे उंच,देखणे काकशेश वंशी अाहेत.हुक्का ओढण्याची प्रथा कुर्दांनीच सुरु केलेली आहे. आक्रमणकारी मंगोल किंवा मोगल हे सोबत जास्त महिलांना घेऊन जात नसत.जिकडे जाईल त्या महिलांशी लग्न करत.काकशेस वंशी तुर्कांनी सुद्धा भारतावर आक्रमण केले हो ते.ते येताना सोबत फार कमी महिला घेऊन आले होते.त्यांनी मोगलांच्या अगोदर भारतात दिल्ली वरती राज्य केले होते.नंतर हे सुलतान दक्षिणेकडे येऊ लागले. कुर्द आणि त्यांचे बांधव तुर्क यांचा प्राचीन धर्म हा भारतीयांप्रमाणेच सनातनी धर्म होता परंतू अरब आक्रमणामुळे नाईलाजाने त्यांना ईस्लाम स्विकारावा लागला. कुर्द हे स्वत:ला प्राचीन मिदी लोकांचे वंशज समजतात.मिदी आणि अरब यांचे संबंध चांगले असल्यामुळे सुरुवातीला अरबांनी त्यांना धार्मिक स्वातंत्र दिले होते परंतू नंतरचे काही अरब राजे क्रूर निघाले.कुर्द लोक हे त्यांची वेगळी संस्कृति आजही टिकवून आहेत.याच कारणामुळे सद

उज्जैन आणि धारचे प्राचीन वंश

Image
काळे(कार्दमक वंश) ---सुमारे ३५० वर्षे उज्जैन वरती शासन करणारा वंश. फार प्राचीन वंश आहे हा. फार प्राचीन काळापासून हे लोक कालीचे पुजारी आहेत. परंतू संस्कृती करणामुळे आता तेथील पुजाऱ्यांची आणि तेथील लोकांची आडनावे बदलली आहेत. माझा एक काळे आडनावाचा मित्र आहे तो सांगतो कि १५ व्या शतकात हे लोक उज्जैन मधून आले आणि त्यांना नगर जिल्ह्यात वतने मिळाली होती. गुप्त राजांनी त्यांचा पराभव केल्यावरती बरेच काळे हे पाचव्या शतकातच दक्षिणेकडे आले होते. काळे हे कालील ा मानणारे तर गुत शासक हे वैष्णव होते. माझ्या आजोळचे आडनाव काळे आहे. पवार -----परमार वंश परमार हे सुरुवातीला राष्ट्रकूटांचे सामंत होते. इतिहासकारांच्या मते हा मूलतः दक्षिण भारतीय वंश आहे परंतू नंतर या वंशाचे संस्कृतीकरण झाल्यामुळे याचा सबंध अग्निवंशाशी जोडला गेला आहे.अग्निवंशाच्या मिथकाची कथा परमारांच्या काळात प्रचिलित नव्हती.कोणत्याही परमार शासकाने अग्निवंशाच्या मिथकाबद्द्ल एक अक्षर हि लिहिले नानव्हते परंतू परमारांच्या सुमारे ४०० वर्षानंतर म्हणजे १५ व्या शतकात हि कथा निर्माण केली गेली आहे. पवार/पोवार हे आडनाव महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्र

दक्षिण भारतातील नायकांचा इतिहास

Image
मदकरी नायक आणि शिवाप्पा नायक हे कर्नाटकातील नायकांचे प्रमुख राजे होत. हे नायक मूलतः आंध्र-प्रदेश च्या तिरुपती जवळच्या टेकड्यांतील शुष्क आणि दुष्काळी भागात राहत होते. हे लोक मल्लिकार्जुनचे निस्सीम भक्त होते. नंतर यांनी कर्नाटकाच्या पश्चिम घाटात स्थलांतर करून या भागात राज्य केले. आंध्र-प्रदेशातील सध्याचे भोयार/बेडर हे यांचे पूर्वज.महाराष्ट्रातील रामवंशी(रामोशी) वंशाच्या नायकांचे मूळ सुद्धा यांच्यातच आहे. मदने,भोसले,गायकवाड,खोमणे हि रामवंशी लोक ांची प्रमुख आडनावे.यांपैकी मदने सोडून इतर सर्व आडनावे इतर समाजात आढळतात. याचा अर्थ मदने लोक त्यांच्या प्राचीन परंपरेनुसार आंध्र-प्रदेशातील दुष्काळी भागात सुद्धा निवास करत होते. तसेच बरेच मदने लोक महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या पश्चिम घाटक्षेत्रात सुद्धा घुसले होते. मदने हे आडनाव इतर समाजात न आढळण्याचं कारण म्हणजे हजारो वर्षांच्या काळात मुख्य जमातीच्या अनेक पोटजमाती निर्माण झाल्या आहेत.वनात भटकत असताना मदने लोकांचा पश्चिम घाटातील आदिवाशींशी थेट संपर्क आला. नंतर आदिवाशींमध्येही पोटजमाती निर्माण होऊन या पोटजमाती मदने यांच्यापासून दुरावत गेल्या आ

कूर्ग(कोडवा) लोक

Image
कूर्ग लोक हे कर्नाटकातील मैसूर जवळच्या कोडवा या पर्वतीय क्षेत्रात राहतात. ब्रिटिशांशी यांनी अतिशय निकराचा लढा दिला होता. बरेच ब्रिटिश मारले होते परंतू शेवटी यांची ताकद कमी पडली. ब्रिटिशांनी या भागात कॉफीची लागवड केल्यामुळे यांची आर्थिक भरभराट झाली. तसेच आधुनिक शिक्षणाचा लाभसुद्धा मिळाला. यांचा राजा राजेंद्र वडियार ने त्याची मुलगी राणी व्हिक्टोरिया ला सेवा करण्यासाठी दान केली आणि ब्रिटिशांनी जप्त केलेली संपत्ती परत मिळविली. नंतर तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारून  ले. कर्नल जॉन कॅम्पबेल शी विवाह केला. अगोदर हिचा विवाह ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या शीख राजा दुलीप सिंह शी करायचा होता परंतू हिचा विवाह ले. कर्नल जॉन कॅम्पबेलशी लावण्यात आला. हे लोक इतर दक्षिण भारतीयांपेक्षा दिसण्यात आणि वागण्यात फार वेगळे आहेत. यांचा आवाज खडा आणि स्पष्ट असतो. इतर दक्षिण भारतीय काय काय बोलतात हे सुद्धा कळत नाही.

शिलाहार राजवंश

Image
आज तान्हाजी हा चित्रपट बघितला म्हणून मला शिलाहार राजांची आठवण झाली. उत्तर कोकणातील योद्धे घडविण्यात शिलाहार राजांचे महत्त्वाचे योगदान आहे. मालुसरे हे आडनाव सुद्धा फक्त उत्तर कोकणातच आढळते.या भागातच "मल्लसर" या प्राचीन जमातीचे वास्तव्य होते. आजही हि जमात केरळमध्ये आढळते. या वंशाचा उदय उस्मानाबाद येथील "तेर" या ठिकाणी झाला म्हणून हे राजे "तेर-पुराधीश" हि उपाधी लावायचे. या वंशाचा संस्थापक हा "कपर्दिन" प्रथम हा होता. कपर्दिन हा शब्द जास्तकरून जैन धर्माशी संबंधित आहे. कपर्दि म्हणजे "जटा" हा शब्द शिवा आणि वृषभदेव यांच्याशी संबंधित आहे.

Great Antiquity of “Hamdan” and “Zanjan” province of the Iran

Image
In ancient times Hamdan city was known as “Ecbatana” or Hangmetane means the place of gathering. City was found by Havkshtra the great king of Median dynasty. Madan,Hebrews,Arab and Aram tribes were relatives of each other were living together in Syrian desert. Only Aram tribe had their own script but this script didn't get royal touch or kingship yet. Median king “Havakshtra” the great had made this script as royal script of his empire. Out of those tribes Madan tribe was closely associated with Arab tribes. Many Arabic people were settled in Hamdan city and learnt alphabets there. Later they developed their own "Arabic" script from Aramaic script. Ancient name of Zanjan city in Iran was “khamesh”. This city was ruled by “Zanje” tribe which was sub-tribe of Madan tribe. Later in 6th century Iran was conquered by Arab's and they changed name of two cities to Hamdan and Zanjan in memory of their relatives Madan and Zinje tribe. Hamdan is very respectful word

ईराणच्या हमदान आणि झणजंन शहरांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा

Image
हमदान आणि झणजंन हि दोन्ही शहरे ईराणच्या पर्वतीय क्षेत्रात आहेत.एकबताना हे "हमदान" शहराचे ऐतिहासिक नाव. हमदान शहराची स्थापना "मिदि" वंशाचे सम्राट "हवक्षत्र महान" यांनी केली होती. एकबताना हे नाव "अजा-एक-पदा" वरून आले आहे. एक पायाचा मेंढा "मदन" लोकांची मुख्य देवता होती. एकबताना किंवा हंगमेताना म्हणजे एकत्र जमण्याचे पवित्र स्थळ. ईजिप्त चा अर्थ हि काहीसा असाच आहे. "हाट-का-पताह" (ईजिप्त), हाट म्हणजे स्थान,का-म्हणजे एकच आत ्मा,पताह म्हणजे ईश्वर,हाट-का-पताह" म्हणजे सर्वोच्च पित्याच्या आत्म्याचे निवास्थान. मदन,मोरी म्हणजेच यहुदी,पारसी,अरब आणि अराम हे लोक भटके लोक होते आणि परस्परांचे नातेवाईक होते.मूलतः या जमाती होत्या परंतू नंतर यांच्यातून स्वतंत्र धर्म निर्माण झाले. यांच्यापैकी अराम लोकांकडे लिपी होती. परंतू या लिपीला अजून राजाश्रय मिळाला नव्हता. मदन वंशाचे सम्राट हवक्षत्र महान यांनी या लिपीला राजाश्रय मिळवून दिला.इतिहासात पहिल्यांदाच या भटक्या जमातींना राजवैभव अनुभवायला मिळाले. अनेक अरब,अराम आणि यहुदी लोक या