Posts

Showing posts from 2020

भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज

Image
भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी(शालिवाहन) ने नाशिक येथील नाणेघाट येथे क्षहारात(प्राकृत:खरात) वंशी शक क्षत्रप नहपान यांचा पराभव केल्यावरती खरात लोक साताऱ्याच्या म्हसवड भागात आले.त्यानंतर "कार्दमक" या शक वंशाने उज्जैन येथे शक साम्राज्याची पुनर्स्थापना केली. आजच्या दिवशी इसवी. ७८ साली शक क्षत्रप चष्टन यांनी राज्याभिषेक करून राजा हि उपाधी धारण केली. शक क्षत्रप चष्टन यांचा पुत्र म हाक्षत्रप रुद्रदामन अतिशय विद्वान ,प्रजापालक,संस्कृत भाषेवरती प्रभुत्त्व असणारे शासक होते. त्यांनी गुजरात येथील जुनागढ येथे संस्कृत भाषेतील भारतातील सर्वात प्रथम शिलालेख लिहिला. त्यावेळेस ब्राह्मी हि लिपी सामान्य लोकांना समजण्यासाठी अतिशय क्लीष्ट होती. रुद्रदामन यांनी लिपीच्या विकासावरती सुद्धा फार भर दिला. त्यांच्या जुनागढ येथील संस्कृत शिलालेखात सर्वात प्रथम आजच्या देवनागरीचे पुरावे मिळतात. रुद्रदामन नंतर त्यांचे पुत्र महाक्षत्रप रुद्रासिम्ह गादीवरती बसले. जुनागढ येथील शिलालेखात रुद्रदामन य

गुढीपाडवा इतिहास:

Image
गुढीपाडवा इतिहास: गुढीपाडवा एक मंगल दिवस.गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या बलाढ्य क्षहरात(प्राकृत भाषेत:खरात) वंशी शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्व तंत्र केला.त्या काळी हा अद्वितीय असा विजयोत्सव गुढ्या उभारून साजरा करण्यात आला. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते? इसवी सन.७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते.अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस.या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे " क्षहरात(खखरात) वंस -निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे -- "क्षत्रियांचा गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव या

Dubai princess Sheikha Mahra riding horse

Image
Dubai princess Sheikha Mahra riding horse

Ancient “Sumerian” deities(Ancient Iraq before 4500 years ago)

Image
Ancient “Sumerian” deities(Ancient Iraq before 4500 years ago) Sin was moon god of ancient Sumerian people.Sin was shown as father of the goddess Ishtar and sun god “Shamash”. Goddess “Ishtar”(Western Venus) was shown in the form of star.Sumrians considered El(Eloah) as the king & father of all the gods.

प्राचीन सुमेरियन देवता(प्राचीन ईराक)

Image
प्राचीन सुमेरियन देवता(प्राचीन ईराक) सिन ही सुमेरियाची चंद्रदेवता होती.ईस्थर(पाश्चिमात्य: व्हीनस) या देवीला तार्याच्या स्वरुपात दाखवत.त्यांच्यासाठी ईल(ईलाह) हा सर्वोच्च देव होता.सिन या चंद्रदेवतेला देवी ईस्थर आणि सुर्यदेव(शमाश) यांचा पिता दाखविले आहे.

प्राचीन भारतीय वेशभुषा(२००० वर्षांपूर्वी)

Image
प्राचीन भारतीय वेशभुषा(२००० वर्षांपूर्वी) Ancient Indian dressing (Before 2000 years ago) संदर्भ :सांची,मध्य प्रदेश येथील शिल्प

प्राचीन भारतीय पुरोहित राजा आणि विठ्ठल यांची तुलना

Image
प्राचीन भारतीय पुरोहित राजा आणि विठ्ठल यांची तुलना

प्राचीन आणि शास्त्रीय काळातील भारतीय राजांची तुलना

Image
प्राचीन आणि शास्त्रीय काळातील भारतीय राजांची तुलना Ancient Indian king & Classical period Indian king comparison

५००० वर्षांचा भारतीय वेशभूषेचा इतिहास

Image
५००० वर्षांचा भारतीय वेशभूषेचा इतिहास 5000 years old history of Indian dressing

प्राचीन सुमेरियन महिलांची वेशभूषा(प्राचीन ईराक ,४५०० वर्षांपूर्वी)

Image
प्राचीन सुमेरियन महिलांची वेशभूषा(प्राचीन ईराक ,४५०० वर्षांपूर्वी) Ancient Sumerian women dressing(Ancient Iraq,Before 4500 years ago

प्राचीन ईराकच्या वन्य जमातींचे नेतृत्त्व करणारा सडपातळ बांध्याचा, देखणा आणि धाडसी राजा

Image
प्राचीन ईराकच्या  वन्य जमातींचे नेतृत्त्व करणारा सडपातळ बांध्याचा, देखणा आणि धाडसी राजा(प्राचीन ईराक,४२०० वर्षांपूर्वी) बऱ्याच वेळेस या मुलांना वनवास भोगावा लागला होता. उच्च वर्गाकडून झालेल्या आपल्या सुंदर आणि निष्पाप आईच्या अपमानाच बदला घेताला होता.

मेसोपोटेमियाच्या(प्राचीन ईराकच्या) सभ्यतेचा ३००० वर्षांचा इतिहास

Image
मेसोपोटेमियाच्या(प्राचीन ईराकच्या) सभ्यतेचा ३००० वर्षांचा इतिहास

प्राचीन इराकच्या उरुक शहरातील पुरोहित राजाचा पूर्ण पुतळा(५३०० वर्षांपूर्वी)

Image
प्राचीन इराकच्या उरुक शहरातील पुरोहित राजाचा पूर्ण पुतळा(५३०० वर्षांपूर्वी) Full statue of Priest king of Uruk city of ancient Iraq(Before 5300 years)

प्राचीन इराकच्या उरुक शहरातील "पशुपति" रूपातील पुरोहित राजा(५३०० वर्षांपूर्वी)

Image
प्राचीन इराकच्या उरुक शहरातील "पशुपति" रूपातील पुरोहित राजा(५३०० वर्षांपूर्वी)  Priest king of Uruk city depicted as master of animals(Before 5300 years)

राजा असुरबनीपालची सिंहासोबत लढत(प्राचीन सिरिया[/असेरिया,२६०० वर्षांपूर्वी)

Image
राजा असुरबनीपालची सिंहासोबत लढत(प्राचीन सिरिया[/असेरिया,२६०० वर्षांपूर्वी) King Asur-Bani-Pal fighting with lion,Ancient Syria/Assyria(Before 2600 years)

युगांडा राष्ट्राध्यक्ष आणि सुमेरियन पुरोहित यांची तुलना

Image

सुमेरियाच्या कृषक आणि पुरोहित वर्गाची आनुवंशिकता

Image
ईतिहासकारांच्या मते सुमेरियन सभ्यतेतील कृषक वर्ग हा अनुवांशिकतेने गोऱ्या ज्यू,अरब आणि उत्तर आफ्रिकेच्या लोकांशी फार जवळ होता तर शासक वर्ग हा सावळा होता.शासक वर्गाचा कृषक समाजातील महिलांशी विवाह होऊन पुरोहितांची निर्मिती झाली.प्राचीन काळी धार्मिक विधी म्हणून राजा आणि कृषक समाजातील महिलांचे विवाह होत.जेव्हा ही सभ्यता भरभराटीस आली त्यावेळेस पुरोहित वर्गाचे वर्चस्व वाढले आणि काही वर्षातच या सभ्यतेचा अंत झाला.

प्राचीन ईराक ची सुमेरियन सभ्यता(ईसवी.पूर्व. ३५००-ईसवी.पूर्व.२०००)

Image
७००० वर्षांपूर्वी या ठिकाणी शेतीला सुरुवात झाली. ५५०० वर्षांपूर्वी उरूक या शहराची स्थापना झाली. त्याकाळी उरूक हे जगातील सर्वात प्राचीन शहर होते.त्याकाळी या शहराची लोकसंख्या ८०,००० होती. उरूक शहराची स्थापना एका अतिशय उच्च व्यक्तिमत्त्वाच्या पुरोहिताने केली होती.हा मुळात "मदन" वंशाचा एक वैदिक पुरोहित होता आणि एकेश्वरवादी होता.वेदांत कृष्णाला असुर म्हटले आहे. मूळ वैदिक लोकांना इंद्राने भारताबाहेर हाकलले होते कारण  ते इंद्राला नाकारून असुर या सर्वश्रेष्ठ देवाला मानणारे होते .वेदांत सुरुवातीला असुर हि सर्वश्रेष्ठ देवता होती परंतू नंतर मतभेद होऊन काही लोक इंद्राला मानू लागले होते .सुरुवातीला या सभ्यतेत मंदिरे नव्हती. उरूक शहरात दिवसभर आग तेवत ठेवून लोक आगीची उपासना करायचे. परंतू नंतर च्या ५०० वर्षांत या सभ्यतेत बहुदेववाद,मंदिर,पाखंड आणि देवदासी प्रथेला सुरुवात झाली.नंतर एकमेकांवरती कुरघोडी करण्यासाठी कुटील वर्गाला हाताशी धरून डावपेच वाढू लागले.पुढच्या ५०० वर्षांत अराजकता निर्माण होऊन या सभ्यतेत यादवी माजली.याच काळात अक्कड वंशाच्या सरगोन ने या सभ्यतेवरती विजय मिळविला. ४७०० वर

1500 years old history of ancient civilization of Sumer(Ancient Iraq)

Image

Shrewd and priestly class in the Sumerian civilisation of ancient Iraq(4500 years ago)

Image

प्राचीन सुमेरियाच्या उरुक शहरातील पुरोहित राजा (५५०० वर्षांपूर्वी)

Image
Priest king of Sumerian civilization of the city of the Uruk(BCE 3300,Ancient Iraq)

प्राचीन इराकच्या सुमेरियन सभ्यतेतील लगाश शहरातील शासक आणि पुरोहित

Image

प्राचीन इराकमधील कुटील वर्ग

Image
"एन्सी" हा कुटिल वर्ग प्राचीन इराकच्या लगाश शहरात शासक झाला होता.काही सुमेरियन शासकांनीच हा वर्ग तयार केला होता. सुमेरियन शासक सावळे होते मात्र हा वर्ग गोरा होता. या ठिकाणी निळे डोळे हे प्रतिकात्मक आहेत.

प्राचीन ईराक मधील "सिमू-रम" या पहाडी जमातीचा राजा ईडीन-सिन(४००० वर्ष पूर्व)

Image
सिन-हि प्राचीन ईराक मधील चंद्र-देवता होती.याच्या एका हातात परशू आणि एका हातात धनुष्य दिसत आहे.त्याची तुलना चंद्रदेवतेशी केली जात असे.

प्राचीन ईराकमधील ४५०० वर्षांपूर्वीची सुमेर सभ्यतेतील राजकुमारी

Image
4500 years old statue of the princess of Sumerian civilization of ancient Iraq .

गिलगमेष: प्राचीन महापुरुष आणि एक खंबीर नेतृत्त्व

Image
गिलगमेष चा काळ दहाहजार वर्षांच्या हि अगोदरचा आहे.यांनी सभ्य मानवांच्या समूहाला ज्यांनी या जगाची सभ्यता घडविली त्यांना महाप्रलयापासून वाचविले होते. Before 10,000 years ago mighty Gilgmesh saved humans of civilized race from big flood.

भारतात वैदिक पुरोहितांचे महत्त्व कमी होण्याची कारणं

Image
जैन आणि बौद्ध या अवैदिक धर्मांच्या वाढत्या प्रभावांमुळे भारतात शाकाहाराचे महत्त्व वाढू लागले. त्यामुळे यज्ञ आणि पशुबळींचे प्रमाण फार कमी झाले. हिंदू पुरोहित पण जैन आणि बौद्ध या अवैदिक परंपरेतील भिक्षुंप्रमाणे डोक्याचे मुंढन करू लागले.फक्त शेंडी किंवा शिखा हा प्रकार ठेवून त्यांच्यापेक्षा थोडेसे वेगळेपण निर्माण करण्यात आले. यज्ञ आणि पशुबळींपेक्षा तत्वज्ञान आणि गणिताचा अभ्यास या विद्वत्ता मानल्या जाणाऱ्या बाबींवर जास्त भर देण्य ात आला. असे असली तरी ग्रामीण भागात मात्र पशुबळी सुरूच होते मात्र यज्ञात दिल्या जाणाऱ्या पशूंच्या अगणित बळीपेक्षा हि संख्या फार कमी झाली. एका घरात एकाच पशुची बळी देण्याची प्रथा सुरु झाली आणि यज्ञ बंद झाले. नंतर मुस्लिम धर्म निर्माण झाल्यावरती कस्सी पुरोहित मुस्लिमांचे पुरोहित बनले. प्राचीन काळी आमच्यात आणि कस्सी पुरोहित यांच्यात विवाह होत. आमच्या वाडीत अजूनसुद्धा मुस्लिम पुरोहिताशिवाय बोकडाचा बळी मान्य होत नाही.

वैदिक पुरोहितांचा प्राचीन संस्कृतीतील मान आणि भारतातील त्यांच्या अधोगतीची कारणे

Image
कस्सी किंवा कट्टी हे मूलतः वैदिक "होतार" पुरोहित होते . यांचा १०,००० वर्षांचा इतिहास आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत यांच्याशिवाय यज्ञ आणि पशुबळी मान्य होत नसे.नंतर मुस्लिम धर्म निर्माण झाल्यावरती मुस्लिमांचे हे पुरोहित बनले.आजही आमच्या वाडीत मुस्लिम पुरोहितांशिवाय बोकडाचा बळी मान्य होत नाही. प्राचीन काळी यांच्यात आणि आमच्यात विवाह होत. भारतात वैदिक पुरोहितांचे महत्त्व कमी होण्याची कारणं जैन आणि बौद्ध या अवैदिक धर्मांच्या वाढत्या प्रभावांमुळे भारतात शाकाहाराचे महत्त्व वाढू लागले. त्यामुळे यज्ञ आणि पशुबळींचे प्रमाण फार कमी झाले. हिंदू पुरोहित पण जैन आणि बौद्ध या अवैदिक परंपरेतील भिक्षुंप्रमाणे डोक्याचे मुंढन करू लागले.फक्त शेंडी किंवा शिखा हा प्रकार ठेवून त्यांच्यापेक्षा थोडेसे वेगळेपण निर्माण करण्यात आले. यज्ञ आणि पशुबळींपेक्षा तत्वज्ञान आणि गणिताचा अभ्यास या विद्वत्ता मानल्या जाणाऱ्या बाबींवर जास्त भर देण्यात आला. असे असली तरी ग्रामीण भागात मात्र पशुबळी सुरूच होते मात्र यज्ञात दिल्या जाणाऱ्या पशूंच्या अगणित बळीपेक्षा हि संख्या फार कमी झाली. एका घरात एकाच पशुची बळी देण्याच

इंद्राला आवाहन देणारे विश्वामित्र(गुडिया)

Image
गद्दीचे पुत्र राजा गुडिया हे मुळात ऋषी विश्वामित्र होते. त्यांनी इंद्राला आवाहन दिले होते. King Gudea who challenged the gods was Vishwamitra,the great Indian saga who later became king (BCE 2300)

वैदिक आणि अवैदिक पुरोहित

Image
वैदिक काळात भारतात मंदिराचा एक हि पुरावा मिळत नाही. परंतू तुर्की या देशात मात्र ८००० वर्षांपूर्वीचे मंदिराचे पुरावे मिळतात. There was no evidence of temple found in ancient Indian but it was found in ancient Turkey. Evidence of 8000 years old temple is found in excavation carried out at "Gobekli Tepi" of Turkey.

सिंधू-संस्कृतीतील प्रमुख वंश "कस्सी",समाजव्यवस्था ,धार्मिक प्रथा आणि सिंधूच्या पतनानंतरचा इतिहास

Image
सध्याप्रमाणे सिंधू सभ्यतेत जातव्यवस्था नव्हती. एकाच घरातील लोक वेगवेगळी कामे करत. गावातील सर्व लोक मिळून सफाईची कामे करत. शहरात सफाईची कामे करण्यासाठी पगारी कामगार असत. मात्र प्रधान आणि पुरोहितांचा वेगळा वर्ग असे. मोहेंजोदारो या सर्वात मोठ्या शहरात आदिवासींचा प्रभाव होता. नर्तकींचा एक वर्ग होता ज्या प्रधान आणि पुरोहितांचे मनोरंजन करत.इथे जी नर्तिका दिसत आहे ती आदिवासी "भिल्ल" महिला वाटते. मोहेंजोदारो येथील पुरोहितांचा आणि प्रधानांचा वर्ग होता तो "कस्सी" वंशाच्या पुरोहितांचा वर्ग होता. हे पुरोहित दाढी ठेवत मात्र मिश्या काढत असत. ऋग्वेदात वर्णन केलेले हेच ते दास होत.यातील काही दासांनी वैदिक आर्यांचे वर्चस्व मान्य केले ते नंतर भारताचे शासक झाले. कुरुवंशाचा "सुदास" हा जमातप्रमुख राजा भरताचा पूर्वज होता. ज्यांनी आर्यांचे वर्चस्व नाकारले ते दास मात्र मेसोपोटेमियाला "मदन" लोकांच्या आश्रयाला गेले आणि त्यांचे दास बनले. हे मदन मूलतः भारतातील यमुना भागातील होते आणि श्री कृष्णाचे वंशज होते परंतू इंद्राने कृष्णाला हरविल्यानांतर हे लोक सुमेरियात पळून गेले

सिंधू संस्कृतीतील प्रमुख मानववंश,भाषा आणि वर्तमान वंशज

Image
बरेच लोक म्हणतात कि सिंधू संस्कृती हि भारतीय आदिवासी आणि दक्षिण भारतीयांची होती परंतू हे पूर्ण सत्य नाही आहे. सिंधू संस्कृती हि विविध मानववंशानी बनली होती जसे आजचे भारतीय आहेत .भाषा या आद्य-संस्कृत आणि आदिवासींची गोंडी(द्रविड वर्गातील) या प्रमुख दोन भाषा होत्या. लोक काळेसावळे आणि दाढी-मिश्या विरहित असायचे.पुरोहित वर्ग मात्र मिश्या काढून फक्त दाढी ठेवायचा. शेवटच्या टप्प्यात लोकसंख्या ६० लाखापर्यंत पोहोचली होती. लोक उंच,  दिसायला काळेसावळे परंतू देखणे होते. आताचे दक्षिण भारतीय जे घटमूठ ,भांडखोर आणि जाडेभरडे आहेत ते मात्र आदिवाशींतून गेल्या १००० वर्षात उदयाला आलेले आहेत. यात बऱ्याच मराठी,आंध्र आणि मद्रासी लोकांचा समावेश आहे. उंच आणि गोरे पंजाबी,गुर्जर,राजपूत,जाट,काश्मिरी ब्राह्मण ,उपि बिहारमधील ब्राह्मण आणि मुस्लिम लोक मात्र गेल्या २००० वर्षात मध्य-आशियातून आलेल्या सिथियन आणि हुण या हिंसक जमातींचे वंशज आहेत.काही मुस्लिम हे मोघल आणि तुर्कांचे वंशज आहेत. सिथियन लोकांतील मुख्य वर्ग मात्र मेसोपोटेमियातील सभ्य आणि काळासावळा "सुमेरियन" लोकांचा वर्ग होता. या सभ्यतेत मराठी,बंगाली

मल्हारबांची दहशत

Image

*होळकर घराण्याची पुर्वपिठिका*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य नर्मदेपार आसेतूहिमाचल पोहचवण्यात जी काही सरदार घराणी होती त्यामध्ये होळकर  घराण्याच नाव अगदी वरच्या क्रमांकामध्ये घ्यावे लागेल. छ राजाराम महाराजांच्या प्रेरणेने मराठ्यांची घोडी नर्मदेपार जाऊ लागली. नर्मदापार जाणारे मराठा वीर नेमाजी शिंदे त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेऊन थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या सोबतीने मल्हारराव होळकर उत्तर भारत पालथा घालू लागले . स्वकर्तुत्वाने मल्हारराव होळकर माळवा प्रांतातील इंदौर नगरीचे संस्थापक बनले. पुढे अहिल्यादेवी होळकर व महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्यकाळात या घराण्याने राजवैभव मिळवले. परंतु या घराण्याची पुर्वपिठिका खूपच कमी प्रमाणात उजेडात आली आहे. त्या साठीच हा थोडासा प्रयत्न . होळकर घराण्याच्या मूळपुरुषाचे नाव मळीबा अथवा मळीगावडा व मूळ आडनाव वीरकर असून मळीबा पासून सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यापर्यंत 14 पिढ्या होतात. हे घराणे तत्कालीन परिस्थिती , व्यवसायानुसार वीर , होळ, वाफगाव , मांडवगण / कात्राबाद इत्यादी वेगवेगळ्या गावामध्ये काळाच्या ओघात स्थायिक व स्थलांतरित झाले. या घराण्यातील *हरजी*

सुभेदार मल्हारराव होळकर यांना साथ देणारी प्रमुख धनगर घराणी

# १६_मार्च_मल्हारजन्मोत्सव  :- सुप्रसिद्ध अश्या इंदोरच्या होळकर घराण्याचे संस्थापक आणि मराठा स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे तसेच अटकेपार झेंडे रोवणारे सुभ ेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती. महाराष्ट्रा बाहेर मराठा साम्राज्याचा वेगाने विस्तार होत असताना त्यांना जहागीरीत मिळालेल्या माळवा प्रांतात त्यांनी १७३२ साली इंदोर शहराची स्थापना केली आणि आपली राजधानी नेमली. इंदोर शहर वसवताना त्यांनी टोलेजंग राजवाडे बांधायला घेतले. तसेच आपले भाईबंद आणि जातवाले महाराष्ट्रातून इंदुरात आणि माळवा प्रांतात आणले आणि स्थायिक केले. अनेक धनगर घराण्यांच्या उत्कर्षास मल्हारराव होळकर जबाबदार आहेत. मल्हारराव उत्तरेकडे मोहीम आखताना तसेच इंदोरला स्थिरस्थावर होत असताना धनगर समाजातील शिवपूर्व कालीन, होळकरांची पराक्रमी आप्तेष्टमंडळी जशे की लांभाते, बूळे, बारगळ, वाघ, फणसे, वाघमारे ही घराणी मल्हारबांना येऊन मिळली. या पराक्रमी घरण्यांसोबत अनेक असंख्य अशी धनगर घराणी होळकरशाहीत मल्हारबांना आणून वसवली. इंदोरला आलेल्या अनेक घराण्यांनी होळकर घराण्याच्या नेतृत्वाखाली पराक्रम दाखवून होळकरशाही पर्यायाने मराठा साम्

#हिंदवी_स्वराज्याचे_भीष्म_पितामह :- #पराक्रमी_सुभेदार_श्रीमंत_मल्हारराव_होळकर

Image
१६ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा भगवा ध् वज अटकेपार दिमाखात फडकवणार्‍या माळवा प्रांताचे पहिले सुभेदार आणि होळकर सत्तेचे संस्थापक सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जयंती. इ.स.१६९३ साली आजच्या दिवशी होळ गावचे पराक्रमी चौगुला खंडूजी होळकर आणि उत्तर महाराष्ट्र, राजस्थानात आपल्या तलवारीचे शौर्य दाखवणारे जहागीरदार शिवजी बारगळ यांची कन्या जिऊबाई यांच्या पोटी निरा नदीच्या थडी असलेल्या सातारा जिल्ह्यातील होळ गावी तिथीप्रमाणे रामनवमीच्या दिवशी सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला. सुभेदार मल्हारराव होळकरांचे वयाच्या तिसर्‍या वर्षी पितृछत्र तर दहाव्या वर्षी मातृछत्र हरवले. त्यांचे बालपण तळोदे जि.नंदूरबार येथील मामा जहागिरदार भोजराज बारगळ यांच्या भुईकोट किल्ले वजा सातमजली असलेल्या टोलेजंग गढीत गेले. सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या शौर्याच्या कारकिर्दीची सुरूवात झाली, ती इ.स. १७१८ मधील दिल्ली मोहिमेतील एका सनसनाटी प्रसंगानेच. स्वराज्याकडून प्रथम सामान्य मावळा म्हणून लढणार्‍या मल्हरराव होळकर यांची पहिले बाजीराव पेशवे यांच्याशी शाब्दिक