प्राचीन काळांपासून पशुपालन करणारा समाज म्हणजे - धनगर समाज !

प्राचीन काळांपासून पशुपालन करणारा समाज म्हणजे - धनगर समाज ! वैभवशाली आणि गौरवशाली इतिहास घडवणारा समाज म्हणजे - धनगर समाज ! आपल्या पशुपालन या पारंपारीक व्यवसायामुळे सर्वत्र पसरलेला व तेथील भाषेनूसार वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा समाज म्हणजे - धनगर समाज ! पण असे असून देखील आपले सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेची एकोप्याने ठेवन करणारा समाज म्हणजेच - धनगर समाज !
प्रामुख्याने गाई, म्हैस, शेळ्या आणि मेंढ्या अशा दुभत्या जनावरांचे पालन करणाऱ्या या धनगर समाजाचा उल्लेख आजकाल फक्त मेंढपाळ या अर्थाने केला जातोय. मेषपालन करणारा समाज धनगर आहेच पण धनगर शब्दाची व्याप्ती फक्त मेषपालनापर्यंतचीच नाही तर ती दुभत्या पशुपालनापर्यंत आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, दुभत्या जनावरांचे पालन करणारा समाज म्हणजेच धनगर समाज.
वैदिकाची ॠषी परंपरा (Vaidic sanskriti is also developed by ancient Hotar/Hatti tribe of Shepherds.) ,जैन समाजाची मुनी परंपरा ,तर
धनगर समाजाची सिध्द परंपरा या देशात लाखो वर्षापासुन सुरु आहे .
हलू म्हणजे दूध दुधावर जगनारा म्हणजे हा धनगर समाज .हलसिध्दनाथाची(अप्पाचीवाडी)
भाकणुक आजही प्रसिध्द आहे ."या देशावर भगवा झेंडा फडकेल " हे हुईक सांगितल गेल आहे .हालमत हे धनगर समाजाचे सत्यावर आधारित नैतिक विचारधारा आहे .हलमत हेच धनगर समाज भगवदगीते प्रमाणे मानतात .धनगर ही या देशातील आती प्राचीन स्वतंत्र अस्तित्व असणारी विचार व आचार धारा आहे .धनगर ही संपूर्ण देशभर आढळणारी बहुभाषिक जमात आहे .
हटकर,गुर्जर,कुरबर, कुरम्बा, धनगर ,भरवाड ,मालधारी, गाडरी, रायका ,रबारी, पाल, बघेल ,बकरवाल अशी एक ना आनेक बहुभाषिक नावाने धनगर समाज ओळखला जातो .
मुस्लिम समाजापेक्षा मोठी म्हणजे १५ ते १६ कोटि ही एकत्रित लोकसंख्या आहे .
औषधी युक्त शेळया मेंढ्याच दुधातुन आलेली कटाक निरोगीपणा मेंढ़पाळीतुन भटकंती त्यातून ज्ञान प्रदेशाची माहिती त्यामुळे सैन्यातील मोठा सहभाग हे धनगर समाजाचे वैशिष्ट्य राहिले आहे .
हलमता प्रमाणे चालणारा हा समाज सत्यवचनी ,प्रमाणिक ,लढाऊ, देवभोळा ,नागरी रीतीरिवाजापासून दूर ,दिल्या बोलाला जागणारा ,समाज म्हणून प्रसिध्द आहे धनगर समाजाचे श्री विठ्ठल बिरदेव, खंडोबा महालिंगराया .मनग्यानसिद्ध ,हलसिद्धनाथ ,धूळदेव ,श्री मायाक्का ,भीवाईमाता ,कामाई ही कुलदैवत .या सर्व देवळातील पुजारी ब्राम्हण वा गुरव नसून धनगर समाजातीलच आसतात .या देवाच्या मूर्त्याना कोरीव नाक तोंड डोळे नसतात .गोल शाळीग्राम शेंदुराने ताबड़े रंगवलेले आसतात .आजही समाजात नैतिक जागरण करणारी असंख्य सिध्द मंडळी सर्वत्र दिसतात वालुग, सवाष्ण ,देवाच दूध ,यात्रा जत्रा या मध्ये धनगर पुजारीच असतात .ढोल कैताळ ,गजनृत्य ,याच्या तालावर सदगुण जागरण करणार "सुंबरान " सज्जनशक्ति जागरण याची भाव जागृति धनगरी ओव्यातुन आजही होत आसते.
त्यामुळेच धनगर समाजात वरील सर्व सदगुण भावजागृती झाली आहे .या मुळेच या समाजा ने इतिहासात चन्द्रगुप्त ,हक्कबुक्कराय (Founders of Vijaynagar empire),छत्रपती शिवाजी महाराज, मल्हारराव,मातोश्री अहिल्या
ते यशवंतराव पर्यन्त पराक्रमी राज्यकर्ते दिले .आजही बापू बिरु वाटेगावकर ,मध्य प्रदेशातील गुलाबी गैंग च्या संपत पाल,१९५२पासून विधिमन्डळाचे सदस्य राज तपस्वी गणपतराव देशमुख ,उत्कृष्ट प्रशाषक आणणासाहेब डांगे, अजन्म अविवाहित राहून समाजकार्य करणारे लोकबंधू महादेवजी जानकर असे व्यक्ती पेक्षा राष्ट्र मोठे मानणारे अनेक आदर्श राज्यकर्ते देशभर दिले आहेत .
सतत निसर्गाच्या सहवासात, एकाकी खुल्या आभाळाखाली रहायची सवय यामुळे धनगरांच्या दृष्टीकोनात व्यापकता येणे स्वाभाविक होते. सातवाहन, यादवांनी ती व्यापकता दाखवलेली होतीच. या दोन्ही समाजांचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय दृष्टी. आणि तिची मध्ययुगात चुणुक दाखवली ती मल्हारराव होळकरांनी.
महाराष्ट्रावर प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारी दोनच घराणी. पैकी सर्वात प्रथम सातवाहन. त्यांनी साडेचारशे वर्ष सत्ता गाजवत महाराष्ट्र घडवला. सातवाहन हे मुलचे धनगर. दुसरी प्रदीर्घ काळ टिकलेली अत्यंत महत्वपुर्ण सत्ता म्हणजे देवगिरीच्या यादवांची. ही सत्ता साडेतिनशे वर्ष (सन ८३५ ते १३१८) टिकली. नुसती टिकली एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीवर अमिट परिणाम सोडला. यादव हे मुळचे अहिर गवळी. म्हणजेच तेराव्या शतकापर्यंत धनगर-गवळ्यांनीच महाराष्ट्रावर सत्ता गाजवली. एक संस्कृतीचे निर्माण घडवले. आजही महाराष्ट्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या त्याच संस्कृतीचे अनुसरण करत आहे. पण फरक एवढाच आहे कि या दोन्ही समाजांना आजच्या संस्कृतीत जवळपास स्थान नाही.
इतिहासकारांनी सातवाहन व यादवांचा इतिहास फारसा लिहिलेला नाही. जोही लिहिला आहे तो जातीय दृष्टीकोनातुन लिहिलेला आहे. सातवाहनांच्या कुळाबद्दलही अकारण विओवाद निर्माण करुन ठेवला आहे. असो.
यादवांची सत्ता गेली आणि इस्लामी सत्ता आली. या काळापासुन मराठी संस्कृतीचे क्रमश: अध:पतन सुरु झाले. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेचे स्तोम वाढु लागले होतेच. धनगर-गवळी हे व्यवस्थेने शुद्रांत जमा करुन टाकले होते. असे असले तरी चवदाव्या शतकाच्या अखेरपर्यंत हे दोन्ही समाज आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असेच होते.
परंतु प्रकृतीला कदाचित ही संपन्नता मंजुर नव्हती. महाराष्ट्रात १३९६ ते १४०८ या काळात एक भिषण दुष्काळ पडल्याची नोंद आहे. तत्पुर्वीही अनेक पडले असतील पण दुर्दैवाने त्यांची नोंद नाही. या उपरोल्लिखित दुष्काळास दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणुन ओळखले जाते. या दुष्काळात स्थिती एवढी भिषण होती कि गांवेचा गांवे ओस पडली. लाखो जनावरे, माणसे अन्न-पाण्याअभावी या दुष्काळात मरण पावली. लोक झाडांच्या साली, म्रुत जनावरे खावु लागली. शेवटी वेळ अशी आली कि माणसे मृत माणसांनाही खावु लागली.
धनगरांनी राजसत्तांना केलेली मोलाची मदत म्हणजे हेरगिरी. सतत भटकंती असल्याने व चा-यासाठीच हिंडत असल्याने शत्रुमुलुखातील हालचाली त्यांना आपसुक कळत. छ. शिवाजी महाराजांनी नुसत्या गडकोटांसाठी नव्हे तर हेरगिरीसाठीही त्यांचा उपयोग करुन घेतला...पण सर्वात महत्वाचा उपयोग म्हनजे गनीमी कावा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans