महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण म्हणजे दलित चळवळीने अकारण केलेला ब्राह्मणद्वेष हे आहे


'महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण म्हणजे दलित चळवळीने अकारण केलेला ब्राह्मणद्वेष हे आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले. पहिल्या कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, 'चळवळीने ब्राह्मणांचा द्वेष केला; पण स्वतः ब्राह्मण्य घेतले. वास्तविक, बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यामध्ये नेहमीच फरक केला होता. ते लक्षात न घेता त्यांच्या तत्त्वज्ञानाला चळवळीने मूलतत्त्ववादी बनविले.'

'मराठ्यांनी कायमच दलितांच्या खांद्यावर बंदुका ठेवून ब्राह्मणांवर गोळ्या झाडल्या. ग. त्र्यं. माडखोलकर यांनी हे राज्य मराठी लोकांचे का मराठ्यांचे, असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा यशवंतरावांनी दिलेले उत्तर मला राज्यशास्त्राचा प्राध्यापक झाल्यानंतरच नीट उमगले. यशवंतराव म्हणाले होते की, हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकर यांचा असेल. या तीन महापुरुषांच्या विचारांवर आधारित हे राज्य चालेल, असे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता माळी, मराठा व महार यांची मते एकत्र केली, तर या राज्यात सत्ता गाजविता येते, असा सोयीचा अर्थ काढण्यात आला. स्वतः महारांमध्येच अनेक पोटजाती असून त्या पोटजातीही एकमेकांमध्ये रोटी-बेटी व्यवहार करीत नाहीत. इतकेच नव्हे, तर याच पुण्यात मत मांगो, म्हणजेच मांगाने अजून काही मागू नये, अशा घोषणा दिल्या जातात. या वातावरणामध्ये महाराष्ट्र पुरोगामी कसा राहील,' असा प्रश्न कसबे यांनी उपस्थित केला. 'महाराष्ट्राला पुरोगामित्व सिद्ध करायचे असेल, तर बुद्ध, फुले-आंबेडकर यांचा विचार एकत्रित करावा लागेल,' असा विश्वास कसबे यांनी व्यक्त केला.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/dalit/articleshow/47534839.cms

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).