‘मराठी भाषेचा उगम संस्कृतमधून झाल्याचा समज होता. यात तथ्य नसल्याचे संशोधन अठराव्या शतकातच राजारामशास्त्री भागवत यांनी मांडले.
‘‘मराठी भाषेचा उगम संस्कृतमधून झाल्याचा समज होता. यात तथ्य नसल्याचे संशोधन अठराव्या शतकातच राजारामशास्त्री भागवत यांनी मांडले. नाणेघाट (जुन्नर, जि. पुणे) येथे ब्राम्ही लिपीतला बावीसशे वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला. या शिलालेखात ‘महारठीनो’ (अर्थ : मराठी बोलणार्यांनो) हा उल्लेख सापडतो. दुसर्या शतकातील ‘वररुचीचे व्याकरण’ यात मराठी व्याकरणाचे नियम आहेत. अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ‘विनयपिटक’ या पाली भाषेतील धर्मग्रंथात ‘महारठ्ठ’ उल्लेख आहे. श्रीलंकेत सिंहिली भाषेतील ‘दीपवंश’ ग्रंथात ‘महारठ्ठ’, ‘महाराष्ट्र’ शब्द सापडतात. भाषा दोन हजार वर्षे जुनी असली पाहिजे, हा केंद्राचा निकष मराठीच्या बाबतीत सहज सिद्ध होईल, करता येईल.’’
- प्रा. हरी नरके, समन्वयक,
अभिजात मराठी भाषा समिती
- प्रा. हरी नरके, समन्वयक,
अभिजात मराठी भाषा समिती
Comments
Post a Comment