नागवंशीय अहिर(अहिर म्हणजे नाग) महाराष्ट्राचे सत्ताधीश म्हणजे महारठ्ठ होते.

नागवंशीय अहिर(अहिर म्हणजे नाग) महाराष्ट्राचे सत्ताधीश म्हणजे महारठ्ठ होते. महारट्ठी हे सातवाहनकाळात एक पद होते. प्रत्येक रट्ठाचा (आजचा कलेक्टर) करसंकलन ते रक्षणात्मक कार्य करणारे राजनियुक्त प्रतिनिधी होते त्यांना महारट्ठी म्हटले जात होते.स्वत: सातवाहनांनी कनकवीर या महारठीच्या मुलीशी विवाह केल्याचे दाखले आहेत.
प्रसिद्ध विदुषी दुर्गा भागवत यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे म्हंटले आहे ते जास्त बरोबर वाटते.इ.स.च्या २३० मद्धे सातवाहनांची सत्ता कमजोर झाल्यानंतर हे महारट्ठी स्वतंत्र सरंजामदार बनले व काहींनी स्वतंत्र सत्ताही स्थापन केल्या. यात बादामीचे चालुक्य, राष्ट्र्कुट व यादव ही घराणी मोठी साम्राज्ये उभी राहीली. याच काळात महारठ्ठी हे पद वंशपरंपरागत झाले असावे कारण त्यांनी प्राप्त केलेले सामर्थ्य व राजसत्तांची अपरिहार्य गरज.
परंतु काळाच्या ओघात महारठ्ठ लोकांची प्रतिष्ठा फारच कमी झाली. मुस्लिम आणि शिवकालात अनेक महारठ्ठ सरदार झाले.शिवकालात मराठा या शब्दाला महत्व आले. त्यामुळे अनेक समूह स्वत: ला मराठा म्हणवून घेऊ लागले.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).